हृषिकेश पाळंदे यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या सायकल सफरीची माहिती देतं. अहमदाबाद ते जम्मूपर्यंत त्यांनी सायकलवरून प्रवास केला. 1900 किलोमीटर प्रवास केलेल्या पाळंदे यांना या प्रवासात विविध अनुभव आले. मनुष्यस्वभावाचे अनेक नमुने बघायला मिळाले.
या प्रवासात केवळ काय खाल्लं? काय पाहिलं? याची जंत्री देण्याचा लेखकांचा हेतू नाही. तर या प्रवासात भेटलेली माणसे आणि अनुभवलेले प्रसंग यामुळे लेखकाच्या विचारसरणीत काय बदल होतात तेदेखील लेखक येथे सांगतो. त्यामुळे हे केवळ प्रवासवर्णन राहत नाही. सुंदर ललितलेख आणि प्रवासवर्णन अशी सांगड येथे घातली जाते. सायकलवरचा हा प्रवास वेगळे अनुभवविश्व आपल्यासमोर उभे करतो.
Reviews
There are no reviews yet.